संघिष्ट भालचंद्र नेमाडेचे द्वेषयुक्त जातीय विकृत विचार

शासन पुरस्कार प्राप्त कादंबरी ‘हिंदू जगण्याची समृध्द अडगळ’ ही कादंबरी एका जाती द्वेषी, समाजद्रोही, अविचारी, अल्पज्ञानी संघिष्ट व सडक्या विचाराच्या लेखकांनी सन 2010 मध्ये लिहलेली कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये नादान भालचंद्र नेमाडेनी ज्या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, त्या समाजाला त्यांची झालेली अथवा केलेली बदनामी 2020 मध्ये माहित झाल्यामुळे या समाजाचा आताशी कुठे या द्वेषी लेखकाचा निषेध व शासनाकडे तक्रारी केल्या जात आहे.

शासन पुरस्कार प्राप्त कादंबरी ‘हिंदू जगण्याची समृध्द अडगळ’ ही कादंबरी एका जाती द्वेषी, समाजद्रोही, अविचारी, अल्पज्ञानी संघिष्ट व सडक्या विचाराच्या लेखकांनी सन 2010 मध्ये लिहलेली कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये नादान भालचंद्र नेमाडेनी ज्या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, त्या समाजाला त्यांची झालेली अथवा केलेली बदनामी 2020 मध्ये माहित झाल्यामुळे या समाजाचा आताशी कुठे या द्वेषी लेखकाचा निषेध व शासनाकडे तक्रारी केल्या जात आहे. भालचंद्र नेमाडे कडून विशेष समाजाची बदनामी करणे, यात त्यांचे इतिहासाविषयीचे खरे अज्ञान, संघिष्ट मेंदु तर आहेच, पण दुसरे म्हणजे फार मोठे ऐतिहासिक शत्रुत्व व शत्रुविषयीचा मोठा द्वेष कारणीभूत आहे असे माझे मत आहे. प्राचीन काळी देव-दानवांचे सुर-असुरांचे, देव-राक्षसांचे युध्द झाले होते व त्यात दानव, असुर व राक्षसाचा संव्हार केल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. प्राचीन काळी जो दानव, दैत्य, असुर, राक्षस जनसमुह मानला जात होता तो वस्तुत: पणी, द्रविड, नाग, अर्य, श्रमण, विश, कृषक समाज होता. या मुळनिवासी (बहुजन) व बाहेरुन आलेल्या विदेशी आर्य-ब्राह्मण या दोघांमध्ये झालेले हे युध्द असुन यात मुळनिवासीचा पराभव झाला होता व मोठ्या प्रमाणात संव्हार देखील झाला होता. यामुळे निवासी (बहुजन) जन समुहालाच विदेशी आर्य ब्राह्मणांनी त्यांच्या शासन काळात दानव, दैत्य, असुर, राक्षस, सैतान, विचित्र, अगडबंब, मोठ मोठ्या दातांचे, नरमांस भक्षक, वगैरे नावाने संबोधून त्यांना बदनाम करण्याचा व इतिहास विकृत करुन मुळनिवासींना भ्रमित करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न झालेला आहे. विदेशी आर्य ब्राह्मण, ब्रम्हा, इंद्र, विष्णु, महेश व इतर भारतात येण्यापूर्वी भारताचे मुळनिवासी, भारताचे शासक, मालक हे पणी, द्रविड, नाग, श्रमण, वगैरेची सत्ता व शासन होते. आर्य भारतात आल्यानंतर त्यांनी अन्न, पाणी, निवास, स्त्रिया, पशुमांसासाठी पणी समुहाशी लढाया केल्या. पणी समुहावर त्यांच्या गाई चोरल्याचा खोटा आरोप लावून त्यांनी लढाया सुरु केल्या. वेदग्रंथामध्ये पणी समुह व इंद्राची सर्मा नावाची दुती यामध्ये झालेला संवाद, हा या लढाई, संघर्ष, युध्दाचा पुरावा आहे. पणी समुहा हा भारताचा नायक नव्हे तर महानायक होता व सर्व आर्य इंद्र, विष्णु, ब्रम्हा, महेश वगैरे खलनायक होते. विदेशी आर्य हे असभ्य, असंस्कृत, भटके, लुटारु, लढाकु, स्वैराचारी, अकृषक, पशुपालक, मांसाहारी, वन्यसंपत्ती आहारी, परोपजीवी, शीत प्रदेश निवासी युरोपीय म्हणजे उत्तर ध्रुवीय होते. थंडीपासून बचाव आणि अन्नाच्या शोधात हा घोडे स्वारक क्रुर जनसमुह भारतात आला होता. या उलट भारतातील मुळनिवासी पणी, द्रविड, नाग, श्रमण, अर्य हा जनसमुह अतिशय प्रगत, कृषक, पशुपालक, शिल्पकार (कारागीर) विश्‍व व्यापारी, सुसंस्कृत शासक, स्थिर स्थायीक, सरळ स्वभावाचा, शांतताप्रिय, शस्त्र व घोडे विहीन समुह होता. यामुळे दीर्घकाळ चाललेल्या अर्य व आर्य लढायांमध्ये इ.स.पूर्व 1700 ते 1750 च्या दरम्यान पणी (अर्य) कृषक व व्यापारी समुहाचा पराभव झाला व जीव वाचविण्यासाठी व माता भगीनीच्या इज्जत संरक्षणासाठी हा समुह देशाच्या चारही दिशेला सुरक्षित स्थळी स्थलांतरीत झाला. वरील समुहातील विशेषत: पणी समुह, इसवीसनानंतरचा आजचा लभाना, बंजारा, लमाना (गोर) समाज आर्य आगमनापूर्वी मौल्यवान वस्तु, सोने, चांदी, रुपा, हिरे, मोती, माणिक, रत्ने, लाल, रेशमी वस्त्रे, हस्तीदात, किंमती चमडे, या सर्वांचा विश्‍वस्तरावरील, अति धनवान व्यापारी सुध्दा होता. पण म्हणजे रोकडा व पण्य म्हणजे व्यापारी वस्तु, रोकडा अथवा रोखीने पण्य वस्तुचा व्यापार करणारा हा समुह होता. म्हणून हा समुह पणी (व्यापारी) या नावाने संबोधला जात होता. आर्य पूर्व काळात याच समुहाने मोहेंजोदडो, हरप्पा, कालीबंगा या क्षेत्रात अतिशय प्रगत, समृध्द, शांतताप्रिय, देव, धर्म, जाती, कर्मकांड विहीन आदर्श नागरी, सर्जनशील संस्कृतीची निर्मिती केली होती. हीच संस्कृती विदेशी असंस्कृत, क्रुर, अमानवी आर्यांनी नष्ट केली व तद्स्थानी वर्ण, जाती, ईश्‍वर, धर्म आणि शोषक, कर्मकांडवादी समाज व शासन व्यवस्था निर्माण केली. अशा या अमानवी समाज व शासन व्यवस्थेचा अंत अद्यापही झालेला नाही. सदर प्राचीन पणी, द्रविड नाग, श्रमण म्हणजे कृषक, कष्टकरी समुह आर्यांच्या (अकृषकाच्या) शोषण व गुलामीतुन मुक्त होऊ नये म्हणून स्वातंत्र्यानंतर सुध्दा आर्य ब्राह्मण, सनातनी संघिष्ट राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या माध्यमाने आज रोजी आरक्षण, नोकर्‍या, रोजगार, शिक्षण बंद करुन, व शेत जमीन अधिग्रहन कायदा बनवून मुळनिवासी बहुजनांचा संव्हार करण्याच्या अनेकविध योजना विद्यमान सरकार अंमलात आणत आहेत. हे सर्व कट कारस्थान आता मुळनिवासी बहुजनांच्या लक्षात आल्यामुळे गेल्या दिड महिन्यापासून राजधानी दिल्ली सीमेवर शेतकरी-कष्टकरी आरपारची लढाई लढत आहे. या लढाई अथवा आंदोलनात आता सर्व बहुजनांनी एकत्र येऊन आरपारची लढाई करणे व शत्रुला पराभूत करणे अति आवश्यक आहे. नसता बहुजनांची गुलामी शोषक, छळ, अन्याय, अत्याचार, निरक्षरता, बेरोजगारी, उपासमार, कुपोषण, कुत्र्याच्या मौतीने मरण, विदेशात विक्री, माता-बहिणीचे शील व चीर हरण, उघडे नागडेपणा, भटकंती, वेठबिगारी, यापुढे कायम टिकून राहण्याची दाट शक्यता आहे. करीता भावी काळात, गुलाम व वेठबिगार बनून राहण्यापेक्षा सध्याच्या शेतकरी-कामगार आंदोलनाबरोबर संघर्ष करुन इतिहास घडविण्याचे महान कर्तव्य आपल्या समोर आहे. आता काही करा अथवा मरा, गुलामी करा, वेठबिगार बना हे दोनच पर्याय मुळनिवासी बहुजनासमोर आहे. वर्तमान सरकार व त्यांचे पितृ संघटन राष्ट्रीय स्वयं सेवक संघ हा देशाशी व बहुजनांशी कधीही एकनिष्ठ, लोकशाहीवादी नव्हते व आजही नाहीत. ते पूर्णत्र: मनुवादी आहेत. बहुजनांची या मनुवाद्यावर ते बदलतील म्हणून आजपर्यंत विश्‍वास ठेवून मूर्खपणा व स्वयंघात करुन घेतलेला आहे. सर्व सत्य लपवून खोटा इतिहास व मनुशाही देशात आणण्याचा त्याचा दृढ विश्‍वास व प्रयत्न दिसून येत आहे. तेव्हा बहुजनांसमोर त्यांच्याशी दोन हात केल्याशिवाय आता दुसरा पर्याय उरलेला नाही. प्राचीन काळापासून आर्य लोक भारतात येण्यापूर्वीपासून सिंध संस्कृतीचा पणी, द्रविड, नाग, श्रमण समाज (आजचा बंजारा, लभाना, लमाना) काळ प्रवाहात कोण कोणत्या जवळ-जवळ 150 नावाने संबोधला गेला याची तपशीलवार माहिती मी पुढच्या पृष्ठावर दिलेली आहे. बंजारा समाज स्वत: कधीही बंजारा, लभाना, लमाना, लंबाडा, म्हणवून घेत नाही व समजत सुध्दा नाही. तो स्वत:ला प्राचीन काळापासून गोर म्हणवून घेतो व स्वसमाजात गोर नावानेच ओळख देतो. बंजारा, लभाना, लमानी, लंबाडी हे नाव मुगल मुस्लीम काळानंतर दुसर्‍या शासक वर्गांनी दिलेली, संबोधलेली नावे आहेत. या व इतर काही नावाने त्याची सरकारी दप्तरी नोंद झाली असली तरी पूर्ण देशात तो स्वसमाजाकडून गोर नावानेच संबोधला व ओळखला जातो. लभानी अथवा लमानी नावाचा एक दुसरा जनसमुह सुध्दा भारतात राहतो. त्यांची जीवनशैली व्यवसाय सोडून गोर बंजारा सारखीच आहे. पण गोर बंजारांनी त्यांच्याशी बेटी व्यवहार केलेला दिसत नाही. पण डोके सजावटी वरुन व दागीने वापरावरुन तो दुसरा समाज म्हणून सहज ओळखू येतो. वंजारा समाज देखील दोन आहे. एक गोर वंजारा आणि दुसरा मराठा वंजारा. पण या दोघात कोणतेही साम्य नाही. वर्तमान गोर बंजारा, लभानी, लमानी, लंबाडी समाज आर्यपूर्व काळात पणी नावाने संबोधला जात होता, असे अनेक इतिहासकारांनी त्यांच्या ग्रंथात कथन केले आहे. या इतिहासकारांच्या नावाचा व ग्रंथाचा उल्लेख मी पुढील पृष्ठावर केला आहे, ते वाचकांनी वाचावे. पणी अर्थात (गोर बंजारी, गोर लभानी, गोर लंबाडी व आर्य ब्राह्मण या दोन समुहामध्ये ज्या लढाया झाल्या त्या आर्यप्रमुख इंद्राने त्याची दूती सर्माद्वारे पणी समुहावर आर्याच्या गाई चोरी बद्दल लावलेला खोटा आरोप प्रमुख आहे. वस्तुत: पणी व आर्य समुह दोन्ही पशुपालक होते. पण पणी हे पशुपालन दुध व शेतीकाम, वाहतुकीसाठी करीत होते, तर आर्य हे अन्नाशी अपरिचित, कंदमुळ, फळे, फुले व मांसाहारी असल्यामुळे पशुपालन केवळ मांसासाठीच करीत होते. तेव्हा आर्य लोकच मांसाहारासाठी पणीची ढोरे चोरीत होती. पणींना आर्यांच्या पशु चोरीची गरजच नव्हती, पण आर्यांनी अन्न व मांसासाठी पणीवर मुद्दाम गाई चोरीचे आरोप लावून लढाईला सुरुवात केली. पणी लोक सधन, सुखी, समृध्द, साहसी, बहादुर, स्वाभिमानी, स्वावलंबी होते. म्हणुन ते आर्य प्रमुख इंद्राशी लढाई करायला भ्याले नाही. अनेक वर्षे लढाई करीत राहिले. परंतु घोडे स्वार क्रुर आर्यांपुढे ते शेवटी पराभूत झाले. आर्यांनी त्यांच्या विषकन्या अप्सरा राजा महाराजांना व राजपुत्रांना देऊन त्यांचा विश्‍वासघात केला व शेवटी राज्यकर्ते झाले. पणी गोर बंजारांची युध्दात हार झाल्यानंतर पणी व इतर सर्व सहकारी समुह देशाच्या चारही दिशेला स्वसंरक्षणार्थ जेथे आर्य सहजा सहजी पोहोचणार नाही अशा डोंगराळ, पर्वतीय माळ माथ्यावर, दर्‍या खोर्‍यात जाऊन स्थायीक झाले. ग्रामीण व नगरीय क्षेत्रांशी त्यांनी संबंध तोडला व त्याची ओळख पटू नये म्हणून त्यांनी आपल्या पोशाखात व मुळ नावात सुध्दा बदल केले. असे झाले असले तरी काही बंजारा लोक देशात छद्म वेषात व छद्म नावाने शासन प्रशासनामध्ये होते. याबाबत बोलतांना राजीव दिक्षीतनी सांगितले आहे की, लढाईच्या काळात गाडी लोहार म्हणून काम करणार्‍या बंजारा समाजाने मोगल, मुस्लीम विरुध्द लढणार्‍या भारतीय जवानांना हजारो टन लोखंड वितळून तोफ, बंदुका, तलवारी, बाण, भाले बनवून पुरविल्यामुहे भारतीयांना शत्रुवर विजय मिळविता आले. नसता मोगल-मुस्लीम शासकांचा भारतातुन नायनाट झाला नसता. हे महान काम बंजारा, लमान समाजाने केल्यामुळे बंजारा समाजाचे अन्य समाजापेक्षा किती महान योगदान भूतकाळात मिळाले याची कल्पना लमान समाजाची बदनाम करणार्‍या अविचारी साहित्यकारास आल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय मनुवादाला कंटाळून सिखांनी 15 व्या शातकात स्वतंत्र सिख धर्माची स्थापना केली होती. औरंगजेबाशी झालेल्या युध्दात, सिखांचे नववे गुरु, तेग बहादुरसिंह यांची हत्या करुन त्यांचे धड व डोके दिल्लीच्या चांदणी चौकात फेकले होते. धड व डोके नेणार्‍यास मृत्यू दंडाची शिक्षा जाहिर केली होती. पण गोर लमान समाजाच्या जग प्रसिध्द धनवान व्यापारी लखी बंजारा (लमानी) यांनी धड व डोके व्यापारी माल लादलेल्या बैलगाडीमध्ये लपवून दिल्लीच्या रायसीना तांड्यावर नेले व तेथे आपल्या घरात ठेवून आग लावून गुरु, तेग बहादुरचे अंत्य संस्कार केले. अशा रीतिने लमान समाजाने सिख गुरुंची इज्जत ठेवली. सिख धर्म व समाजाचे रक्षण केले व आपल्या बहादुरीने औरंगजेबाला सुध्दा धडा शिकविला. याच बहादुर लमान समाजाने बुध्द धम्माचे भंतेजी यांना व्यापार करताना, बरोबर घेऊन बुध्द धम्माचा जगभर प्रचार प्रसार केला होता. व्यापारात चोर डाकूंचा सामना करीत जगभर व्यापार करणे हे कार्य परोपजीवी, भित्र्या, आयतखाऊ लोकांचे नाही. स्वाभिमानी, मेहनती, स्वावलंबी, बहादूर, युध्द तज्ञ लोकांचे, समाजाचेच आहे. मानव समाजाच्या इतिहासात आर्य व अन्य आक्रमकांचा बहादुरीने मुकाबला करण्याचे अनेक कामे बंजारा-लमान समाजाने केले आहे. आर्य आगमन काळापासून तर 1857 च्या जगप्रसिध्द युध्दापर्यंत या समाजाने मधल्या काळात, अरब, ग्रीक, पर्शियन, फ्रान्सीस, डच, पोर्तुगीज, मोगल, मुस्लीम या सर्वांशी राजपूत व सिख समाजास घेऊन देश रक्षणाचे काम केलेले आहे. सरकारी तिजोरी लुटण्याचे काम न करता व्यापार, शेती, पशुपालन, मातीकाम, बांधकाम, उद्योग, धंदे करुन स्वाभिमानी, स्वावलंबी, भीकमुक्त जीवन जगत आहे. अशा या मेहनती, स्वाभिमानी, स्वतंत जीवन जगणार्‍या समाजाला मनुवाद्यांनी ब्रिटिशांच्या संगनमताने गुन्हेगारी कायदा लादला. ज्याच्या कष्टावर व निष्ठेवर आपण सुरक्षित जगतो, त्यांच्यावर गुन्हेगारी कायदा लादने हा शासनाचा नीचपणा व अमानवी कृत्य आहे व त्यांच्या माता भगीनीच्या चारित्र्याची लेखकांनी खेळ खेळणे हे त्याहीपेक्षा अनेक पटीने नीचपणाचे कृत्य आहे. कोणत्याही समाजातील 5-10 कुटुंबातील काही माता भगीनी रस्ता चुकून वागत असतील तर त्यांच्या पूर्ण समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणे तर महा नीचपणा, मूर्खपणा, अविचारीपणा समजावा लागेल. मी अशा नीचपणाच्या शासन व लेखकाच्या कुकर्त्याची जाहिर निषेध करतो व समाजाने गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी अपेक्षा व विनंती करतो. प्रा. ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments