बहुजन बंधू भगिनींनो, सावधान, सावधान, सावधान.

बहुजन बंधू भगिनींनो, सावधान, सावधान, सावधान.

दि. 1/1/2023 बहुजन बंधू भगिनींनो, सावधान, सावधान, सावधान. * काळ डोक्यावर घोंगावत आहे. * बळी तो कान पिळी समाज व्यवस्थेचे बळ वाढत आहे. * देशाचा कायदा, आरक्षण, न्याय व्यवस्था धोक्यात आहे. * अन्यायित समाजात विविध क्षेत्रात फुट पाडली जात आहे. * जागतिक स्तरावरचे राजकारणसुद्धा गढूळ बनत चालले आहे. * अन्यायित समाज संघटित होऊ लागलेला नाही. * मनुवाद्यांची गुलामी अंगणात येऊन उभी आहे. * अन्यायित समाजाचा शिक्षित सधन वर्ग कर्तव्याविमुख झालेला आहे. * एकूणच मागासाचे अस्तित्वच संपण्याच्या मार्गावर आहे. * कष्टकरी वर्गाला लोकशाहीची जाणीवच झालेली नाही. * म्हणूनच सर्व मागास बंधू भगिनींनो, झोपेतून जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. * सवर्ण वर्ग शोषक, निर्दय, शक्तीवान व हुकुमशहा शासक बनला आहे. * धर्मवाद, जातीवादाचा अभिमान कमी होण्याऐवजी वाढत आहे. * मनुवाद्यांनी भारताला हिंदुराष्ट्र बनविण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. * हिंदुराष्ट्राची घटनासुद्धा तयार करण्यात आलेली आहे. * हिंदुंची कमी झालेली संख्या वाढविण्यासाठी हिंदुंचे हिंदुकरण करण्याचे कार्य कुंभमेळ्याद्वारे युद्ध पातळीवर चालु आहे. * गैर हिंदुंचे हिंदुकरण करण्यामागे गैरहिंदुंचे अधिकार संपविण्याचा हेतु आहे. * संविधानाने गैर हिंदूंना (आदिवासींना) विशेष अधिकार दिलेले आहे. * आदिवासींचे संविधानिक अधिकार संपवून या अधिकारांचा उपभोग मुळ सवर्ण हिंदू घेणार आहे. * आदिवासींच्या हिंदुकरणामुळे आदिवासी संविधानिक अधिकारहीत होणार आहे. आदिवासींचे हिंदुकरण होताच त्यांची जल, जंगल, जमिनीवरुन हकालपट्टी किंवा अल्प मोबदल्यावर स्थलांतरीत केले जाणार आहे. * आदिवासींचे हिंदुकरण झाल्यावर त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजनैतिक, सांस्कृतिक, साहित्यिक, भाषिक, वस्त्र, अलंकार, विशेष प्रतिके, विशेष आदर्श, इतिहास, इतिहास पुरुष नष्ट केले जाणार आहे. * म्हणून सर्व वंचित आदिवासींनी हिंदू, हिंदुत्व, सवर्ण, सामंतवादी, भांडवलदार, मनुवादीच्या वरील षडयंत्रात भागीदार न होता योग्य तो दुरावा ठेवून सर्व वंचित, आदिवासींनी संघटीत होऊन आपल्या संस्कृती, सभ्यता, अधिकारासाठी, संघर्ष करण्यासाठी दूधपाण्याप्रमाणे एकत्र येण्याची भीम प्रतिज्ञा करावी, असे जाहीर आवाहन आहे. जय भारत - जय संविधान गहरा विचार

G H Rathod

162 Blog posts

Comments